Posts

Showing posts from February, 2023

थोडं मनातलं अजिंठ्याच्या लेण्यांतून घडणारे बुद्ध दर्शन

Image
 थोडं मनातलं  अजिंठ्याच्या लेण्यांतून घडणारे बुद्ध दर्शन ( भाग एक )  औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिद्ध अशी अजिंठ्याची लेणी आहेत. अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालेच्या आकाराची ही लेणी पाहिली की मला कधी कधी मुंबईच्या नरिमन पॉईंटची आठवण येते. नरिमन पॉईंटच्या भोवती सिमेंटचे जंगल आहे. पण ही अजिंठ्याची लेणी अत्यंत निसर्गरम्य वातावरणात वसलेली आहेत. गोलाकार अशा हिरव्याकंच टेकडीवर ही लेणी आहेत. खाली वाघुरा नदीचे खळाळते पात्र आहे. आजूबाजूला प्रचंड मोठे डोंगर आहेत. निसर्गाच्या कुशीत अलगद वसलेली ही मानवी प्रतिभेतून निर्माण झालेली प्रतिसृष्टी. ज्याच्या कोणाच्या डोक्यातून या ठिकाणी अशी अप्रतिम काळावर अमीट ठसा उमटवणारी ही कलाकृती निर्माण करण्याची कल्पना जन्म पावली, त्याच्या सौंदर्य दृष्टीचे कौतुक करायला शब्द कमी आहेत.  अजिंठा, वेरूळची लेणी हा आपला अत्यंत अभिमानास्पद असा जागतिक सांस्कृतिक वारसा आहे. संपूर्ण जगातून येथे पर्यटक येतात. पण आपल्याकडील या अनमोल ठेव्याचे महत्व आपल्याकडील लोकांना तेवढे वाटत नाही. अजिंठ्याला आता काय राहिले आहे, वेरूळची लेणी तर बरीचशी भग्न झालेली आहेत असे म्हण...

थोडं मनातलं - हरवलेल्या रानवाटा

Image
 थोडं मनातलं  हरवलेल्या रानवाटा  असं म्हणतात की आपल्याला सुखानं जगायचं असेल तर भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करू नये. वर्तमान आपल्या हातात असतो. वर्तमानात आनंदात जगावे. ना कालचे दुःख, ना उद्याची चिंता ! तसे तर हे खरेच आहे. पण कधी कधी भूतकाळातील आठवणींचा कप्पा अचानक उघडला जातो. जणू एखादी सुगंधी कुपी अचानक उघडली जावी आणि त्यातल्या सुगंधाचा दरवळ सगळीकडे पसरावा तसे होते. मग दोनचार दिवस मन त्याच धुंदीत विहार करते. ध्यानीमनीही नसताना जणू कालचक्र उलटे फिरते आणि शरीर जरी वर्तमानात असलं तरी मन मात्र त्या काळात विहार करून येतं.  परवाच्या दिवशी अचानक आमच्या गावी खूप दिवसांनी जाण्याचा योग आला. खरं तर खूप वर्षांनी. शहरातले पाहुणे माझ्याकडे आले आणि त्यांनी त्या गावाला जाण्याचा इच्छा व्यक्त केली. आता रस्ता चांगला झाल्याने अर्ध्या तासातच तिथे पोहोचता येतं. मग काय सकाळी सकाळीच पोहोचलो तिथे. तिथे जाताना एक अनामिक हुरहूर मनात होती. कसं असेल हे माझं गाव आता ? ओळखेल का ते मला ? या गावात जो विश्वास नावाचा छोटा मुलगा काही वर्षे वावरला, त्याच विश्वासला आता हे गाव स्वीकारेल ? बरोबर आहे, त...

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

Image
थोडं मनातलं  लग्नाला जातो मी ...  मराठीमध्ये लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून अशी एक म्हण आहे. जो कोणी या अनुभवातून जाईल त्यालाच त्यातला गहन अर्थ कळतो. म्हणतात ना ' जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे .' काय एकेक म्हणी आठवताहेत आज ! आपल्या मराठी भाषेचा प्रभाव, दुसरं काय ! तर ते असो. झालं असं की काही दिवसांपूर्वी मी एका लग्नाला गेलो होतो. लग्न केल्याचा आणि घर बांधल्याचा असे दोन्ही अनुभव मी घेतले. त्याला बरीच वर्षे झाली. त्याबद्दल नाही बोलत मी. उगीच कशाला सांगायचे ते ! अहो, आपले अनुभव आपल्यापाशी असलेले बरे. नाहीतर कोण काय म्हणेल काही सांगता यायचे नाही. हां, तर मी काय सांगत होतो ? तर मी एका लग्नाला गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे ? आम्ही सगळेच जातोच की लग्नाला. तर मंडळी, मला काय म्हणायचे आधी नीट ऐकून तर घ्या.  मी आणि आमच्या सौ एका लग्नाला गेलो होतो. लग्न ठरले ठरले म्हणून बऱ्याच दिवसांपासून कानावर येत होते. जवळच्या नात्यातील लग्न असल्याने ते लांब असले तरी जाणे क्रमप्राप्त होते. तेव्हा आम्ही लग्नाच्या एक दिवस आधीच इच्छित ठिकाणी पोहोचलो. मी आधीपासून आमच्या हिला म्...

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..

Image
थोडं मनातलं  माती भिडली आभाळा...  ' गारंबीचा बापू '  या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे. ' अजब सोहळा, माती भिडली आभाळा...' रवींद्र साठे यांनी  असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की  मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे.  पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ? आपण कधी गेलो का तिथे ? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं.  मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ' माऊली ? ' एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने ...