Posts

Showing posts from September, 2022

थोडं मनातलं - आनंदनिधान

Image
 थोडं मनातलं  आनंदनिधान  जॉन किट्स नावाचा एक कवी असं म्हणतो की, A  thing of beauty is joy forever . याचा अर्थ असा की एखादी खरोखरची सुंदर गोष्ट असते ती कायमस्वरूपी आनंद देणारी असते. त्या गोष्टीजवळ कधीही गेलं तर ती आनंदाचीच बरसात करणार. तिच्याजवळ असणारा तो आनंदाचा ठेवा कधीही कमी होत नाही. परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला लताबाईंची ( म्हणजे आपल्या लतादीदी हो ! ) पहिली जयंती साजरी झाली. त्या आता असत्या तर ९३ वर्षांच्या झाल्या असत्या. म्हणजे ही ९३ वी जयंती. लतादीदी म्हणजे आनंदनिधान होत्या. त्या होत्या तेव्हाही त्यांच्यावर भरपूर लिहिलं गेलं, बोललं गेलं. आता त्या नाहीत तरी त्यांच्यावर भरपूर लिहिलं जातंय, किंबहुना पहिल्यापेक्षा अधिकच लिहिलं जाईल. २८ तारखेला त्यांच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल सांगणारे खूप लेख आहे. वर्तमानपत्रांच्या शनिवार रविवारच्या पुरवण्या त्यांच्या लेखांनी रंगल्या. एकंदरीत २८ संप्टेंबरचा दिवस ' लतामय ' झाला होता.  लतादीदींवर कोणी लिहिलं नाही ? ज्याला ज्याला वाटलं तो तो लिहिता झाला. अगदी आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांच्यापासून त...

यांना काही कळतच नाही ....!

थोडं मनातलं    यांना   काही   कळतच   नाही   ....! काही  दिवसांपूर्वी पेपरमध्ये एक बातमी वाचली. जपानी सम्राट अकीहितो म्हणे आपल्या राज्यपदाचा त्याग करून आपला पुत्र नारूहितो याची सम्राट्पदी नियुक्ती करणार आहे. आता या घटनेने तेथील जनतेला कोण आनंद झाला म्हणे..! जपानी सम्राटाला तेथे दोनशे वर्षांची परंपरा आहे म्हणे. आणि तीस वर्षांनंतर तेथील लोकांना नवीन राजा मिळणार आहे. आता हा आनंद लोकांना साजरा करता यावा म्हणून जपान सरकारने म्हणे दहा दिवसांची सुटी जाहीर केली आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी दहा दिवसांची सुटी देणे लोकांना अजिबात आवडलेले  नाही . त्यांनी त्याबाबतीत नाराजी व्यक्त केली. म्हणूनच मी म्हणतो की  यांना   काही  कळत  नाही . आधी मुळात चूक त्या जपानच्या सम्राटाची . कोणी सांगितले  नाही  तरी स्वतः हून तो पायउतार झाला. राहिला असता अजून  काही  वर्षे तर कोणी  काही  म्हटले असते का  ?   नाही तर आमच्याकडे भारतात पाहा. कोणी म्हटल्याशिवाय आम्ही सत्तेतून बाजूला व्हायला तयार नसतो. सगळ्या कर्...

व्हायचं तर नायक व्हा

 थोडं मनातलं  व्हायचं तर नायक व्हा  आपण मोठ्या आवडीने चित्रपट पाहत असतो. कधी मोठया पडद्यावर तर कधी घरातील छोट्या पडद्यावर. बहुतेक साऱ्या चित्रपटांच्या कथा नायक आणि खलनायक यांच्या संघर्षावर आधारित असतात. या संघर्षात शेवटी नायकाचा विजय होऊन खलनायकाचा पराजय किंवा अंत झालेला आपल्याला बघायला मिळतो. असं झाल्यावर आपल्यालाही आनंद होतो कारण आपल्यालाही वाटत असते की दुष्ट, खलप्रवृत्ती असलेल्या नायकाचा पराभव व्हावा आणि सद्गुणी असलेल्या नायकाचा विजय व्हावा. एका अर्थाने सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तींचा हा संघर्ष असतो. चांगल्या आणि वाईटातील हा संघर्ष पुरातन काळापासून चालत आला आहे. बऱ्याच वेळा समाजात चांगले हरताना दिसते आणि वाईटाचा विजय होताना दिसतो. पण ही स्थिती कायम राहत नाही. एक दिवस असा येतो की वाईट गोष्टींची, वाईट व्यक्तींची सद्दी संपते आणि चांगल्याचा विजय होतोच. The truth always prevails.  नायकाचा विजय पडद्यावर पाहताना आपल्याला आनंद होतो खरा पण हा विजय मिळवण्यासाठी नायकाला किती परिश्रम करावे लागतात याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. म्हणून कधीही नायक समजून घ्यायचा असेल तर आधी खलन...

थोडं मनातलं सावळ्या रंगाची बाधा

Image
थोडं मनातलं  सावळ्या रंगाची बाधा  सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी असं ग दि माडगूळकरांचं माणिक वर्मा यांनी गायीलेलं एक गीत आहे. साधारणपणे सावळा रंग म्हटला की प्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो तो कान्हा, कृष्ण. मग लक्षात येतं की अरेच्या ! केवळ कान्हाच कुठे आहे सावळा ? राम, विष्णू, शंकर, विठ्ठल असे आपले सगळे महत्वाचे देव तर निळ्या किंवा सावळ्या रंगातच दाखवले जातात. निळा किंवा सावळा रंग. सावळा म्हणजे थोडासा काळा आणि थोडासा निळा देखील. या रंगांमध्ये खरं तर एक जादू, एक गूढ लपलं आहे बरं का ! जे जे अफाट आहे, अगणित आहे, आपल्या नजरेत न मावणारं आहे, ते ते सगळं आहे काळं किंवा निळं. नाही पटत का ? बघा, आपल्या डोक्यावर हे अनंत पसरलेलं आकाश निळ्या रंगाचं आहे. समुद्र ! अथांग पसरलेला. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी. तोही निळा. हातात थोडंसं पाणी घ्या. त्याला कुठलाही रंग नाही. पण त्याच पाण्याच्या थेंबांनी बनलेला सागर मात्र निळाईची गूढ शाल ओढून आहे. रात्री मात्र हे पाणी गूढगर्भ काळं दिसतं. आणि निळं दिसणारं आकाश ? खरं तर तेही निळं नसतं. उंच अवकाशात गेलो की निळा रंग नाहीसा होऊन सर्वत्र काळ्या रंगाचं साम्...

रातोंके साये घने...

Image
 थोडं मनातलं  रातोंके साये घने...  माणसाचं जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांचं यांचा मेळ असतो. सुख आणि दुःख एकेकटं कधी येत नाही. आपण जेव्हा अत्याधिक आनंदात असतो, तेव्हा मनात कुठे तरी धाकधूक असते की हे नक्की खरंय का ? हे संपणार तर नाही ना ? आणि खरंच कोणतीही परिस्थिती सतत कायम कधीच राहत नाही. सुखाच्या पाठोपाठ दुःखाचा प्रवेश जीवनाच्या रंगमंचावर होतोच. किंबहुना जेव्हा सुख आनंदी कपडे घालून रंगमंचावर प्रवेश करते तेव्हा त्याच्या पाठीमागे विंगेत दुःख वाट पाहत उभेच असते. सुख आणि दुःख दोन्हीही येतात आणि आपल्या जीवनात त्यांची भूमिका बजावून जातात. आपण किती आनंदी राहायचे, किती दुःखी व्हायचे हे ते आपल्यावर सोडून देतात. कन्फ्यूशियस नावाचा एक तत्वज्ञ होता. त्याला एकदा त्याच्या शिष्याने विचारले की सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत लक्षात ठेवावी अशी कोणती गोष्ट आहे ? तेव्हा कन्फ्यूशियसने उत्तर दिले की आपण एकच  गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे ' हेही दिवस जातील. ' आपण सामान्य माणसे ! कधी कधी संकंटांची मालिकाच आपल्या स्वागताला उभी असते. एक झाले की दुसरे. अशा वेळी आपला धीर साहजिकच खचतो. आपण...